Uncategorized

पुणे जिल्ह्यातील 19 धरणातून उजनी धरणात १० टीएमसी पाणी सोडा नाही तर आंदोलन करणार : प्रा. झोळ

करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यासह बार्शी, माळशिरस, सांगोला, माढा तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहिर झाला. सद्यठ परिस्थितीमध्ये उजनी मध्ये १५ टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे.
पुणे जिल्हातील १९ धरणातून १० टिमसी पाणी उजनी मध्ये सोडल्यास त्याचा फायदा पुणे जिल्हातील बारामती, दौंड, इंदापूर ह्या तालुक्याला सुध्दा होणार आहे. पुणे जिल्हातील सर्व धरण १००टक्के भरले अाहे. त्याचा सर्व तालुक्यातील जनतेला होणार आहे.
भविष्या अडचणी उद्भवू नये यासाठी पाणी सोडणे महत्त्वाचे आहे. पाणी सोडण्याचे नियोजन न झाल्यास किंवा सकारात्मक भूमिका न घेतल्यास धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन प्रा. रामदास झोळ यांनी दिले आहे.

यावेळी बोलताना प्रा. रामदास झोळ म्हणाले की, करमाळा तालुक्यातील लोकप्रतिनिधी शांत बसलेले आहेत उजनी पाणी मायनसला जात असताना उजनीच्या पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने जायकवाडी धरणात नाशिक अहमदनगर जिल्हातील धरणामध्ये ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्याच धर्तीवर उजनी धरणामध्ये पाणी सोडणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button